चितगाव – भारतीय संघाने यजमान बांगलादेशचा पहिल्या ( BAN vs IND ) कसोटी सामन्यात 188 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. दोन्ही डावांत मिळून 8 गडी बाद करत फलंदाजीतही चमक दाखवलेला डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सामन्याचा मानकरी ठरला.
ऑस्ट्रेलिया म्हटलं की विषय संपला! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या दोनच दिवसात जिंकला कसोटी सामना
या ( BAN vs IND ) कसोटीत भारताचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकली व पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रवीचंद्रन अश्विन, ऋषभ पंत व कुलदीप यादव यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 404 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत गुंडाळला व 254 धावांची मोठी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलिया म्हटलं की विषय संपला! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या दोनच दिवसात जिंकला कसोटी सामना
त्यानंतर फॉलोऑन न देता भारतीय संघाने आपला दुसरा डाव सुरू केला. या डावात शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा यांनी दमदार शतकी खेळी केली. भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला व बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावा करण्याचे मोठे आव्हान ठेवले. बांगलादेशने दुसऱ्या डावात मात्र चांगली लढत दिली.
मात्र, तळात त्यांचे फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांचा दुसरा डाव 324 धावांवर संपला व भारताने 188 धावांनी मोठा विजय प्राप्त करत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून कुलदीप यादवने 3 तर, अक्षर पटेलने 4 गडी बाद केले. आता या दोन संघांतील दुसरा व अखेरचा कसोटी सामना येत्या गुरुवारपासून ढाका येथे सुरू होणार आहे.