१ “स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही…” | Top 10 Marathi News
वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Pail ) यांनी जळगावातील एका कार्यक्रमात “स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही,” असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता बराच वादंग झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करताना त्यांनी, “मी एवढंच म्हटलं की ऑर्थोपेडीक डॉक्टर स्त्रियांच्या आजाराला तपासू शकत नाही, स्त्रीरोगतज्ज्ञ ऑर्थोपेडीक रुग्णाला तपासू शकत नाही. अस्थीरोगतज्ज्ञ बालरोगाच्या रुग्णाला तपासू शकत नाही. आमचं म्हणणं आहे की आमचं कामही डॉक्टरप्रमाणेच आहे. आम्ही जनरल फिजीशियन आहोत.” असं स्पष्टीकरण दिलंय.
२ ‘उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नेते राहिले नाहीत’
राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thakrey ) यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना राज ठाकरे व भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटी चर्चेचा विषय ठरत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांत मनसे भाजप एकत्र लढणार का असाही प्रश्न उपस्थित होत असताना बावनकुळे यांनी, ‘युती बाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हिंदुत्ववादी नेते राहिले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या कार्याला बगल देऊन ते आपलं काम करत आहेत.’ असा निशाणाही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना साधला.
३ सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटाचे १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात | Top 10 Marathi News
– खैरेंच्या दाव्याने खळबळ; शिंदे गटाकडून खंडन
शिवसेना नेते व औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील जवळपास १३-१४ आमदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा मोठा दावा केला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. खैरे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील ( Shahaji Patil ) यांनी, ‘चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात आणि ढगात गोळ्या मारतात. वातावरण खराब करण्याशिवाय त्यांना काही वेगळे उद्योगनाहीत,’ अशी प्रतिक्रिया दिली.
४ संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवरून पडळकरांचे उद्धव ठाकरेंना सवाल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती ( shivsena sambhaji brigade alliance ) करत नवं राजकीय समीकरण जुळवून आणलं आहे. संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीवरून भाजप व शिंदे गट मात्र उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधताना दिसतोय. अशातच आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवरून ठाकरेंना सवाल केलेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेपासून खूप मोठी फारकत घेतली. आता त्यांना पुन्हा ट्रॅकवर येणे खूप अवघड आहे, ज्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केला. ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार? अशी विचारणा पडळकर यांनी यावेळी बोलताना केली.
५ केजरीवालांच्या मद्य धोरणावर अण्णा हजारेंची नाराजी | Top 10 Marathi News
दिल्लीतील मद्य धोरणावर भाजप रोज आम आदमी पक्षाला चांगलेच धारेवर धरले आहे. अशातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hajare letter to Kejriwal ) यांनीही मद्य धोरणावर नाराज होऊन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात अण्णांनी, ‘जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते. तुम्हालाही अशा सत्तेची नशा चढलेली आहे वाटते. त्यामुळे दिल्लीमध्ये तुमच्या सरकारने नवीन दारू धोरण तयार केले. ज्यातून दारू विक्री आणि मद्यपानाला प्रोत्साहन मिळू शकेल, असे दिसते.’ अशा शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली.
६ सिसोदियांच्या लॉकरमध्येही काही सापडले नाही
सीबीआयने क्लीन चिट दिल्याचा सिसोदियांचा दावा
सीबीआयने आज मनीष सिसोदिया यांच्या लॉकरचीही झडती घेतली. तथापि, या लॉकरमध्येही काहीही न सापडल्याने सीबीआयने आपल्याल क्लीन चिट दिली आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Mansih Sisodia ) यांनी म्हटले आहे. सीबीआयच्या चार सदस्यीय टीमने दिल्ली जवळील गाझियाबाद येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेत त्यांच्या लॉकरचा शोध घेतला तेव्हा सिसोदिया आणि त्यांची पत्नी उपस्थित होते. सीबीआय दबावाखाली काम करत होती, असे सिसोदिया यांनी शोध संपल्यानंतर पत्रकारांना सांगितले. आज मला सीबीआयकडून क्लीन चिट मिळाल्याचा मला आनंद आहे. माझ्या लॉकर किंवा निवासस्थानाच्या झडतीतून त्यांना काहीही सापडले नाही,” असे सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले.
७ महात्मा गांधींनंतर आता पंतप्रधान मोदींनाच जनतेच्या मनात काय चाललंय ते कळते | Top 10 Marathi News
– राजनाथ सिंह यांनी केला दावा
आपल्या देशातील जनतेच्या मनात काय चालले आहे हे महात्मा गांधी यांना कळत होते. त्यानंतर आता पतंप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) हेच एकमात्र असे नेते आहेत की त्यांना जनमानसाच्या मनात काय चालले आहे ते समजते असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. जे लोक मोदींवर विश्वास ठेवतात त्यांच्याशी ते थेटपणे जोडले जातात, मोदी यांनी विचारधारेशी तडजोड न करता आपल्या नवसंकल्पनांद्वारे भारतीय जनता पार्टीला निवडणुका जिंकणारी मशिन बनवले. संघटनात्मक क्षमता, लोकांशी संपर्क आणि खालच्या स्तरावर असलेल्या अडचणींची समज यामुळे आज मोदी जगातले सगळ्यांत लोकप्रीय नेते ठरले आहेत. असेही त्यांनी नमूद केले.
८ अर्थतज्ज्ञ अभिजीत सेन यांचे निधन ( Abhijeet Sen passes away )
अर्थतज्ज्ञ अभिजीत सेन यांचे आज हदयविकाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. ग्रामीण अर्थकारणाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. नियोजन आयोगाचे ते माजी सदस्यही होते. अर्थकारणाच्या क्षेत्रात ते गेली चार दशके कार्यरत होते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांना अर्थकारणाचेही धडे दिले आहेत. कृषी क्षेत्रातील पिकाच्या लागवडीचा खर्च आणि त्याची किंमत यावर केंद्र सरकारने जो आयोग नेमला आहे त्यावरही त्यांनी काम केले आहे.
९ सिध्दू मूसेवाला हत्येच्या मास्टरमाइंडला अटक | Top 10 Marathi News
पंजाबी गायक सिध्दू मूसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड सचिन विश्नोई याला अझरबैजान येथे अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. ( Siddhu moosewala murder mastermind arrested ) मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी त्याने स्विकारली होती. त्याला आता अझरबैजान येथे ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीतील एका भागातील पत्त्याच्या आधारे त्याने बनावट पासपोर्ट बनवला होता अशी माहितीही समोर आली आहे. त्या पासपोर्टवर त्याचे नाव तिलक राज तुटेजा असे लिहिण्यात आले होते.
१० पंड्याने धोनीला दिले पाकिस्तानविरुद्धच्या धडाकेबाज खेळीचे श्रेय
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्धच्या लढतीत फिनिशरची भूमिका उत्तमरीत्या वठवलेल्या भारताच्या हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) आपल्या कामगिरीचे श्रेय माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ( Mahendrasinh Dhoni ) श्रेय दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाजीत कसा बदल करायचा, केव्हा व कोणत्या गोलंदाजाच्या षटकात धोका पत्करून वेगाने धावा करायच्या हे धोनीकडून शिकलो. तसेच आपल्यासह फलंदाजी करत असलेला किंवा नव्याने खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजावर जबाबदारी टाकण्यापेक्षा आपण पुढाकार घ्यायचा हे धोनीकडून शिकलो, असेही पंड्याने सांगितले.
Top 10 Marathi News Marathi Batmya Latest Marathi News News in Marathi Thalak Ghadamodi Marathi News Live Thalak Ghadamodi