नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत नौदलात सहभागी होण्यासाठी तब्बल 80 हजार युवतींनी नावनोंदणी केली आहे. नौदलात सहभागी होण्यासाठी विक्रमी 9.55 लाख अर्ज आले आहेत. त्यात मुलींची संख्या 80 हजार आहे.
भारतीय नौदलानेच आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर ही माहिती दिली आहे. भारतीय नौदलात अग्निवीर होऊ इच्छिणाऱ्यांच्या रजीस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून 82 मुलींनीही उत्साह दाखवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नौदलात “एसएसआर” आणि “एमआर” या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
“एसएसआर”च्या केवळ 2800 तर “एमआर”च्या केवळ 200 जागा रिक्त आहेत व त्याकरता ही भरती केली जाणार आहे. “एमआर”साठी 10 वी पास उमेदवार अर्ज कर शकतात, तर “एसएसआर”साठी विज्ञान शाखेतून 12 पास झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 1,400 कोटी रुपये किमतीचे 700 किलोग्रॅमपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त
लष्करात पहिल्यांदाच अधिकाऱ्याच्या रॅंकच्या खालील कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी महिलांनाही संधी दिली जाते आहे. अग्निवीरची पहिली बॅच नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू केली जाणार आहे. भारतीय नौदलात सध्या केवळ 30 महिला अधिकारी आहेत.
“…म्हणून मला श्वास घेणे कठीण होत आहे”; कोर्टात खासदार संजय राऊत यांचा ईडीवर गंभीर आरोप