मुंबई – पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचे पथक 31 जुलै रोजी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले होते. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. यावेळी राऊत यांची नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा ईडीने त्यांना अटक केली.
1 ऑगस्ट रोजी राऊतांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांची कोठडी संपल्यामुळे न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आणखी चार दिवस संजय राऊत यांचा ईडीच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे. परंतु, कोर्टात संजय राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी ‘मला श्वास घेण्यास त्रास होत असून खिडकी नसलेल्या खोलीत ठेवण्यात आले होते, असा गंभीर आरोप ईडीवर केला आहे.
कोर्टाने संजय राऊत यांना विचारले की, तुमची ईडीविरोधात काही तक्रार आहे का? त्यावर संजय राऊत यांनी न्यायालयाला सांगितले की, मला जिथे ठेवण्यात आले आहे तिथे व्हेंटिलेशन नाही. मला हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे मला श्वास घेणे कठीण होत आहे. खोलीत खेळती हवा नसल्यामुळे त्रात होत आहे.
उध्दव ठाकरेंना मोठा दिलासा; “धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचा आदेश
रात्रीच्या वेळी जिथे ठेवले जाते तिथे फक्त एक पंखा असल्याचेही राऊत यांनी न्यायालयाला सांगितले. यावर हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने ईडीला प्रश्न विचारला. संजय राऊत यांच्या आरोपांवर ईडीकडून सांगण्यात आले की, संजय राऊत यांना एसीमध्ये ठेवले जात आहे. त्यावर न्यायालयाने राऊत यांना एसी लावला आहे का, अशी विचारणा केली, त्यावर संजय राऊत म्हणाले की, मी पाहिले नाही, तिथे पंखा आहे. मला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मी एसी वापरत नाही.
अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका निवासस्थानावर ईडीचा छापा