नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सोडण्यासाठी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बुधवारी राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवादऐकून आजच्या सुनावणी ढकलली होती. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील कालचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज पुन्हा सुनावणी होणार आहे. आज सकाळी हे पहिल्या क्रमांकाचे प्रकरण असेल, असे सरन्यायाधीश रमण्णा यांनी स्पष्ट केले होते. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली.
राज्यातील सत्तासंघर्षावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असताना ठाकरे गटाच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा पुढे केला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही शिवसेना पक्षातच असून सदस्यत्व सोडले नसल्याचा दावा केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत आज म्हणजेच, गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. शिंदे सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार होणार आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.