प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -श्रावण महिना सुरू झाला आता महिनाभर तरी नॉनव्हेज खाता येणार नाही, अशी मांसाहारी लोकांची खंत असते. हीच कमतरता भरून काढण्यासाठी व शुद्ध शाकाहारी पदार्थांच्या माध्यमातून खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी हॉटेल भैरवी येथे बिर्याणी आणि कबाब फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.
“स्वरा ग्रुप’च्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या फेस्टिव्हलचे उद्घाटन कल्याण भेळचे संस्थापक रमेश कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले. दि. 28 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी बिर्याणी आणि कबाबची चव पुणेकरांना चाखता येणार आहे.
गेल्या सात वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवाला अनेक नामवंत व्यक्तींनी आतापर्यंत उपस्थिती लावली आहे. यावर्षीही पुण्यातील लोकप्रिय अशा कल्याण भेळचे सर्वेसर्वा रमेश कोंढरे यांनी या महोत्सवाचे उ उद्घाटन केलं. यावेळी “चव यशाची’ या कार्यक्रमा दरम्यान त्यांची मुलाखत घेण्यात आली. “आपल्याकडे आलेला ग्राहक खूष होईल अशी सेवा द्या,’ असा सल्ला त्यांनी तरुण हॉटेल उद्योजकांना दिला. त्यांना व्यवसायात आलेल्या अडीअडचणी, त्यातून काढलेले मार्ग याचंही अनुभव कथनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी स्वरा ग्रुपचे सर्वेसर्वा रामदास मुरकुटे यानी स्वरा ग्रूपची पूडची वाटचाल सागताना मल्हार माची मध्ये 8 रूम व जलसृष्टीमध्ये नवीन 5 रूम डिसेंबर 2022 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, असे संगीतले स्वरा ग्रुपचे संचालक विश्वास मुरकुटे यांनी भैरवीमधील बिर्याणी, कबाब मेनू बदलची माहिती दिली.