मुंबई – एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची काळ शपथ घेतली. यानंतर काल रात्री घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ आणि ३ जुलैला अधिवेशन घेण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. यानंतर आज शुक्रवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह करत जनतेशी संवाद साधला.
राज्यातील सत्तापालट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला म्हणाले की, ‘भाजपने हे आधीच करायला हवे होते. निदान त्यांचा मुख्यमंत्री तरी मिळाला असता. ते म्हणाले की, अमित शाह यांनी मला दिलेले वचन पाळले नाही? असे झाले असते तर आज राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा नेता असता. भाजपने केवळ नावापुरतेच एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’“अमित शाह यांनी मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला असता तर हे सरकार शानदारपणे आलं असतं. अडीच वर्ष झाली आहेत. माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे झाले असते तर आज अडीच वर्ष झाली आहेत. जे काही घडलं ते सन्मामाने झालं असतं. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केलं असतं. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असं का केलं’ असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.