मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यापूर्वी उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधायचे मात्र आज त्यांनी शिवसेना भवनात येऊन माध्यमांशी सवांद साधला. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे त्यांनी म्हंटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी मांडले तीन महत्वाचे मुद्दे
१) हे अडीच वर्षांपूर्वीच का नाही केलं ?
शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता तर अडीच वर्षांपूर्वीच का नाही केलं ? हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांग होतो अमित शहा यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ असे सांगितले होते. मग त्यावेळेला ते मान्य का केला नाही ? मला का मुख्यमंत्री केले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
२) मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका
आरे चा निर्णय बदलला तो वाईट आहे असे त्यांनी म्हंटले आहे. माझा राग मुंबईवर काढू नका, माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका असे त्यांनी यावेळी म्हंटले. माझ्यावर राग आहे ठीक आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला ठीक आहे पण मुंबईवर माझा राग काढू नका . आरे चा निर्णय बदलल्याचं वाईट वाटलं. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मी पर्यावरणासोबत आहे. आरे चा निर्णय कृपा करून रेटून नेऊ नका असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. शिवाय सध्या त्यांचं रात्रीस खेळ चाले हे चाललंय… असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला.
३) लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत
लोकशाहीचे चार स्तंभ असतात. लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडून चाललाय. लोकशाही वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत ते थांबवण्याची गरज आहे असे ते म्हणाले.