नवी दिल्ली: सरकारच्या “निष्काळजीपणामुळे” करोना व्हायरस (साथीचा रोग) साथीदरम्यान 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. यासह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
ट्विटरवर, राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना रोखत आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी खरे बोलत नाहीत आणि इतरांना बोलू देत नाहीत. ते खोटं बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही मरण पावले नाही. कोविडच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. मोदीजी तुमची जबाबदारी पार पाडा. पीडित कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई द्या, अशी मागणी राहूल यांनी केली.
भारताने शनिवारी देशातील कोविड-19 मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी ‘जागतिक कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओ करत असलेल्या प्रयत्नांना भारत थांबवत आहे’ या शीर्षकाच्या लेखाला उत्तर म्हणून एक निवेदन जारी केले होते.