मुंबई – छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदे’मध्ये धर्मगुरु कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते.
यावेळी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरताना गांधींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचं कौतुक केलं. दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्यावरून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी निराजी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ट्वीट करत, “अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा’ असं म्हंटलं आहे.
हा कलीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे
कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि याऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करततो
अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा
हा सनातनी आहे
निवडणुकीला उभा राहिला 247 मत्त मिळाली pic.twitter.com/Xybsp97kyk— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 27, 2021
“हा कलीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि याऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करततो अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा हा सनातनी आहे निवडणुकीला उभा राहिला 247 मत्त मिळाली.’ या आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.