औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाविकास आघाडी बाबत मोठे विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नसल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही. तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल असे वाटत नाही तसेच महाविकास आघाडीचे घोटाळे मी काढणार नाही असेही ठाकरे म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला आहे. त्यावेळी हे मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा नेमका काय अर्थ घ्यावा असा प्रश्न सर्वानांच पडला आहे.