दुबई – फिरकीपटू जाडेजा आणि वेगवान गोलंदाज शमीच्या प्रत्येकी 3 बळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंड संघास अवघ्या 85 धावांवर रोखले. तसेच जसप्रीत बुमराह याने 2 तर आर. आश्विनने 1 गडी बाद केला.
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला आणि भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्काॅटलंड संघास 17.4 षटकांत सर्वबाद 85 धावांच करता आल्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी केवळ 86 धावांचे आव्हान आहे.
स्काॅटलंडकडून फलंदाजीत सलामीवीर जॉर्ड मुन्सीने सर्वाधिक 24 त्यापाठोपाठ मायकेल लीस्कने 21, कॅलम मॅकलिओडने 16 आणि मार्क वॉटने 14 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत जडेजाने 4 षटकांत 15 धावा देताना 3 गडी बाद केले. शमीनेही 3 षटकांत 15 धावा देत 3 गडी बाद केले. बुमराहने 3.4 षटकांत 10 धावा देत 2 गडी तर आर आश्विनने 4 षटकांत 29 धावा देत 1 गडी बाद केला.