नवी दिल्ली – देशातील प्रौढ नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या करोनालसींच्या डोसची संख्या 89 कोटींच्या घरात पोहचली आहे. एकूण प्रौढांपैकी 69 टक्के जणांनी किमान एक डोस घेतला आहे. तर, 25 टक्के प्रौढांचे दोन्ही डोस मिळाल्याने लसीकरण पूर्ण झाले आहे.
केंद्र सरकारकडून लसीकरण मोहिमेशी संबंधित आकडेवारी गुरूवारी देण्यात आली. त्यानुसार, लसीकरणात देशाच्या ग्रामीण भागाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या डोसमध्ये ग्रामीण भागाचा वाटा 64 टक्के आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात डोस पुरवण्याची ग्वाही लस उत्पादकांनी दिली आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत लसीकरणाला आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.
देशातील करोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारीला झाला.