नवी दिल्ली – “जर उद्या अश्लिल व्हिडीओ प्रकरणात अटकेत असलेला राज कुंद्रा भाजपात गेला, तर भाजपवाले त्याचे व्हिडिओ रामायणाचे आहेत असे म्हणणार का.? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते गोंदियात बोलत होते.
काय म्हणाले नाना पटोले, “ईडीने सर्व विमानतळ प्राधिकरणाला अनिल देशमुख यांच्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. या कायदेशीर बाबी आहेत, मात्र जे लोक भाजपाविरोधात आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जाते.
भाजपात काय दुधाने धुतलेली लोकं आहेत का? भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही का? जर उद्या राज कुंद्रा भाजपात गेले, तर ते व्हिडीओ रामायणाचे आहेत असे भाजपा म्हणणार आहे काय? कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. हे काही चालू आहे ते सर्व चुकीचे आहे. ”
खंडणी वसुली घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. आणि याच मुद्यावरून नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.