नवी दिल्ली – देशात निदान एकदा तरी जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपल्या राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेणार आहेत.
ते उद्या त्यासाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यांच्या या मंत्रिमंडळात भाजपचेही प्रतिनिधी असणार आहेत. जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकार तयार नाही, पण बिहारमधील भारतीय जनता पक्षाने मात्र नितीश कुमार यांच्या मागणीशी सहमती दर्शवली आहे.
ओबीसींची देशातील लोकसंख्या नेमकी किती आहे याची जनगणना केली जावी, अशी अनेक राजकीय पक्षांची मागणी आहे. पण मोदी सरकारने अजून या मागणीला धूप घातलेली नाही. उद्या अकरा वाजता आम्ही मोदींना या संबंधात भेटून निवेदन देणार आहोत, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.