नवी दिल्ली – विराट कोहलीनंतर ऋषभ पंत हाच भारतीय संघाचा कर्णधार बनेल, असा दावा सिक्सर किंग युवराज सिंग याने केला आहे.
पंतकडे नेतृत्वाची क्षमता आहे हे त्याने गेल्या मोसमातील आयपीएल स्पर्धेत दाखवून दिले आहे, अशी पुष्टीही त्याने जोडली.
भारताला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवणाऱ्या खेळाडूंमध्ये आता पंतचाही उल्लेख होत आहे. गेल्या तसेच यंदाच्या मोसमातही अनेक सामने जिंकून देण्यात त्याने योगदान दिले आहे, असेही युवराज म्हणाला.