औरंगाबाद/ पुणे – साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प यशस्वी होण्याच्या मर्गावर आहे. धाराशिव साखर कारखान्यातून येत्या दोन तीन दिवसांत वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प सुरू होईल. दरम्यान, उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक राज्याने ऑक्सिजन निर्मिताचा महाराष्ट्र पॅटर्न स्विकारण्याचे ठरवले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर हा उपाय करण्याचे नियोजन केले आहे.
साखर कारखान्यातील इथेनॉल प्लांटमधून वैद्यकीय दर्जाचा ऑक्सिजन तयार करण्याचा देशातील पहिली चाचणी उस्मानाबद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने सुरू केली आहे. एकदा हा प्रकल्प यशस्वी झाला की राज्यातील सर्व कारखान्यात तो राबवला जाणार आहे. राज्यात एकूण 195 साखर कारखाने आहेत. त्यातील 137 कारखान्यात इथेनॉल प्रकल्प आहेत. तर सुमारे 12 कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प स्वयंपूर्ण आहेत. करोनाच्या साथीच्या काळात ऊस गाळपाचे रुपांतर ऑक्सिजन निर्मितीत करण्याचीच ही प्रक्रिया असल्याचे मानले जात आहे.
या प्रकल्पांची व्यवहार्यता तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अल्कोहल तंत्रज्ञान आणि जैविकइंधन विभागातील शास्त्रज्ञ प्रा. संजय पाटील यांन सिांगितले की, उत्तर प्रदेश सरकारच्या साखर आयुक्तांनी या पथदर्शी प्रकल्पाचा तपशील मागवला होता. त्यांनी त्यात सहभागी होण्यासाठी अनुकुलता दर्शवली आहे.
धाराशिव साखर कारखान्याचे मालक अभिजित पाटील म्हणाले, आम्ही उत्पदनासाठी तयार आहोत. पक्त उत्पादित केलेला ऑक्सिजन हा वैद्यकीय दर्जाचा आहे आणि तो वापरण्यायोग्य आहे, याचे प्रमाणपत्र मिळण्याचे बाकी आहे. तैवानमधून यंत्रसामुग्री येण्यास विलंब झाल्याने तीन दिवसांचा उशीर झअला. आम्ही 20 मेट्रीक टन ऑक्सिजन दररोज तयार करू.
उत्तर प्रदेश सरकारही अनुकुल
आमच्या राज्य सरकारच्या 15 इथेनॉल कम डिस्टलरी प्रकल्पामध्ये हा उस्मानाबाद पॅटर्न राबवण्याच प्रयत्न करणार आहोत. त्यातून 300 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचा आमचा प्रयत्न असेल. राष्ट्रीय साखर संघटना आनि पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने हा प्रकल्प तडीस नेण्यात येईल, असे उत्तर प्रदेशच्या अबकारी, साखर उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, येथे घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.
इथेनॉल प्रकल्पासाठी काही यंत्रसामुग्री तैवानमधून आयात करावी लागते. राज्यात एकूण 61 इथेनॉलचे प्रकल्प आहेत. त्यातील 15 प्रकल्प राज्य सरकारच्या अबकारी खात्याचे आहेत या प्रकल्पांची क्षमता 60 किलो लिटर आहे. त्यातून 20 टन ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते. तर एक प्रकल्प 120 किलो लिटर क्षमतेचा आहे. त्यातून 40 मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मिती होऊ शकते, असे भुसरेड्डी यांनी सांगितले.
देशाचे नेते शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन तयार करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून आम्ही सदस्य कारखान्यांसोबत पाच बैठका घेतल्या. त्यातील तीन व्हर्चुअल स्वरूपाच्या होत्या. त्यात धाराशिव साखर कारखान्याने तयारी दाखवली. इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञामनी त्यांना मार्गदर्शन केले. येत्या दोन ते दिवसांत हे उत्पादन सुरू होईल. अन्य काही कारखान्यांनी या बाबत स्वारस्य दाखवले असून त्यासही मार्गदर्शन करण्यात येईल.
– शिवाजीराव देशमुख (महासंचालक, वसंतदादा शुगर इंन्स्टीट्यूट)