पुणे (प्रभात वृत्तसेवा) – एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साही वातावरणात कोविडचे सर्व नियमाचे पालन करत ध्वजारोहण करुन संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शिवाजी काकडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सर्वप्रथम राष्ट्रगीत संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी काकडे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व मुंबईसह महाराष्ट्र कसे स्वातंत्र्य झाले. त्यानंतर 105 हुतात्म्यांनी होतात्म्य कसे पत्करले याविषयी काकडे यांनी माहिती सांगितली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेचे संस्थापक अध्यक्षा अनिता साप्ते, संस्थेचे सचिव अनिल साप्ते, संस्थेचे उपाध्यक्ष आनंद साप्ते, संस्थेचे सदस्य माधव दंडवते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी काकडे यांनी विशेष भूमिका बजावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सोमनाथ स्वामी यांनी केले.