मुंबई – पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींची मालमत्ता शासन जप्त करेल व ज्यांची फसवणूक झाली असेल त्या व्यक्तींना त्यांची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंदर्भात ऍड.निरंजन डावखरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी व त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेचा शोध घेणे सुरू आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दिरंगाई केली असेल त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केली असल्याचे आढळल्यास पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून त्यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही देसाई यांनी दिली.