मुंबई – देशात सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या, टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी प्रत्येकी २५० रुपये आकारले जाणार आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.
देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. एवढी मोठी तरतूद केलेली असताना सामान्य नागरिकांकडून २५० रुपये का आकारले जात आहे, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
१ मार्चपासून देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात ४५ किंवा ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रामध्ये कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. यामध्ये केंद्र सरकारने लसीची किंमत २५० रुपये प्रति डोस इतकी ठेवली आहे. यालाच पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे.
दरम्यान या वर्षाच्या अर्थसंकल्पात देशातील लसीकरण मोहिमेसाठी 35 हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील आणि 75 कोटी लोकसंख्येचे लसीकरण करता येईल. अर्थात भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्य आहे. मात्र तरी केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.