नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. चारही सदस्य जम्मू काश्मिरचे प्रतिनिधित्व करतात. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, गुजरातमधील यात्रेकरूंवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी सर्वात आधी फोन मला गुलाम नबी आझाद यांचा आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. तर त्यांचे अश्रू थांबत नव्हते.
त्यावेळी प्रणब मुखर्जी संरक्षण मंत्री होते. त्यांना फोन करून विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असे सांगितले. तेव्हाच गुलाम नबी आझाद यांचा फोन आला. त्यावेळी एखादा माणूस जसे कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच त्यांचीही होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे,” असं सांगत असताना पंतप्रधान मोदींचे डोळे भरून आले.
सत्ता जीवनात येत-जात राहते. ती कशी सांभाळावी हे गुलाम नबी आझाद यांच्याकडून शिकावे. एका मित्राच्या रूपात आझाद यांचा मी खूप आदर करतो, असेही त्यांनी म्हंटले.
मोदी पुढे म्हणाले, मी संसदेत नव्हतो. मी आणि गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा करत होतो. त्यावेळी पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी गुलाम नबी म्हणाले होते, आम्हाला नेहमी वादविवाद करताना बघता पण, आम्ही कुटुंबासारखे आहोत. गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरची आठवण यावी असं गार्डन तयार केलेलं आहे,” असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं.
#WATCH: PM Modi gets emotional while reminiscing an incident involving Congress leader Ghulam Nabi Azad, during farewell to retiring members in Rajya Sabha. pic.twitter.com/vXqzqAVXFT
— ANI (@ANI) February 9, 2021