मुंबई – पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा मनसे पक्षाचा निर्धार आहे. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करु, असे सांगितल्याने या महापालिका निवडणुकांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेत वाक्य युद्ध पेटले आहे .
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला विरप्पन गँग म्हणून टीका केली होती. त्यावर सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेचा टाईमपास गँग म्हणून उल्लेख करत सणसणीत टोला लगावला.
दरम्यान, ‘पक्ष आहे की संघटना आहे, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपण का लक्ष दिले पाहिजे, ही तर निव्वळ टाईमपास गँग आहे’ असं म्हणत आदित्य ठाकरेंचा सणसणीत टोला लगावला.