मुंबई – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार येत्या दहा वर्षांमध्ये तब्बल 94 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हा जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो.
कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. त्यामुळे अशा भयानक आजाराची जनजागृती करणं आवश्यक आहे.
दरम्यान, आपल्या कडे कर्करोगाची जनजागृती करणारे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. यामध्ये अनेक प्रतिभावंत कलाकारांनी या आजाराशी संबंधित असलेल्या भूमिका साकारल्या आहे. यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यापासून शाहरुखपर्यंत सर्व कलाकारांचा समावेश आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढत देऊन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
आनंद – दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ चित्रपटात एका कॅन्सरग्रस्त तरुणाची भूमिका साकारली होती. आनंद सहगल नावाची भूमिका त्यांनी साकारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा आनंद चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
सफर – आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकेनं अमाप लोकप्रियता मिळवलेल्या प्रसिध्द कलाकार राजेश खन्ना यांनी 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सफर’ नावाच्या चित्रपटात एका कॅन्सर पेशंटची भूमिका साकारली होती. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी अविनाश नावाच्या तरुणाची भूमिका साकारली होती. तर शर्मिला टागोर यांनी नीला नावाच्या डॉक्टरती भूमिका केली होती.
कल हो न हो – 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने एका कॅन्सरग्रस्त तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांच्याही प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. शाहरुखला या भूमिकेसाठी फिल्मफेयरचं अॅवॉर्ड मिळाले होते.
ऐ दिल है मुश्किल – 2016 मध्ये रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने कॅन्सर ग्रस्त मुलीची भूमिका साकारली होती.यामध्ये तिला ४ थ्या स्टेजचा कॅन्सर आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका होत्या.
दिल बेचारा – लॉकडाऊन दरम्यानचा सर्वात चर्चेत आलेला चित्रपट म्हणजे, ‘दिल बेचारा’ बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट होता. त्याच्या जोडीला अभिनेत्री संजना सांघी दिसली होती. यात दोन्ही कलाकारांना कॅन्सर असल्याचे दाखविण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.