मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
I don’t know. Maharashtra CM has clearly said that for us, it is Sambhajinagar & will remain so. It’s a matter of people’s feelings, so we can discuss it but the decision has been taken: Shiv Sena MP Raut on being asked why Congress opposes renaming Aurangabad to Sambhajinagar pic.twitter.com/lVd5qntnhr
— ANI (@ANI) January 17, 2021
संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे केल्या आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे आणि संभाजीनगरच राहणार. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण चर्चा करू शकतो.
दरम्यान, औरंगाबादचे नामकरण “संभाजीनगर’ असे करण्याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याने आणि त्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाल्याने नामांतराच्या या विषयावरून मतांतरे दिसू लागली आहेत. मात्र याबाबतही महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं सांगितलं आहे.