मुंबई – अखिल भारतीय किसान सभेने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे नेते अजित नवले आणि अशोक ढवळे, सीटू संघटनेचे डॉ डी.एम. दरार आणि सुनिल मालुसरे आदि नेत्यांनी आज नाशिक येथे ही घोषणा केली.
केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे केवळ उद्योगपतीच्याच लाभाचे आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे आमचा या कायद्यांना विरोध आहे आणि हा विरोध नोंदवण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते 21 डिसेंबर रोजी दिल्लीला जाणार आहेत.
आमच्या या दिल्लीवारी मध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. आमच्या संघटनेचा इलेक्ट्रीसिटी दुरूस्ती विधेयकालाही विरोध आहे असे त्यांनी सांगितले. उर्जा क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा सरकारचा हा डाव असून त्यातून वीज ग्राहकांना मोठाच भुर्दंड बसणार आहे असे त्यांनी नमूद केले.