पुणे – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे सहा वर्षांपूर्वी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला होता. यामध्ये 115 ठिकाणी विकास कामे सूचवली होती. यासाठी सुमारे 237 कोटींचा अर्च अपेक्षित होता.
मात्र, हा आराखडा लालफितीच्या कारभारात अडकल्याने पर्यटनाचा विकास व त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार “एमटीडीसी’च्या सहकार्याने जिल्ह्याचा पर्यटन आराखडा 2014 मध्ये तयार करून तो शासनाला पाठवला होता.
पुणे जिल्ह्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व आहे. पुण्याची ओळख जगभर पोहोचविण्याच्या दृष्टीने पर्यटन विभाग काम करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आला होता.