नवी दिल्ली– माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचे आज पंतप्रधानांनी दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.
आज डिजिटल इंडियाकडे कोणताही नियमित शासकीय उपक्रम म्हणून पाहिले जात नाही, तर आज ती विशेषत: गरीब, उपेक्षित आणि सरकारमधील लोकांसाठी जीवनशैली बनली आहे. डिजिटल इंडियामुळे आपल्या देशाने विकासाकडे अधिक मानव केंद्रित दृष्टिकोनातून पाहिले. तंत्रज्ञानाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे नागरिकांसाठी व्यापक बदल झाले आहेत आणि त्याचे फायदे स्पष्टपणे दिसून येत आहेत. सरकारने डिजिटल आणि तंत्रज्ञान वापरासाठी केवळ बाजारपेठ निर्माण केली नाही, तर त्यांना सर्व योजनांचा एक महत्त्वाचा भाग बनवला आहे. त्यांचे शासन मॉडेल हे तंत्रज्ञान प्रथम आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी प्रतिष्ठा वाढवण्यात आली आहे ज्यात एका क्लिकवर कोट्यावधी शेतकर्यांना आर्थिक मदत मिळत आहे आणि जगातील सर्वात मोठी आयुषमान भारत ही आरोग्यसेवेशी निगडित योजना यशस्वीरीत्या सुरू आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही तंत्रज्ञानाने गरीबांना योग्य आणि त्वरित मदत उपलब्ध केली गेली.
भारतात तयार होणाऱ्या तांत्रिक सुविधा आता जगभरात उपलब्ध करून द्यायला हव्यात असे ते म्हणाले. गेल्या महिन्याभरात आर्थिक देवघेवीसाठी 2 अब्ज वेळा तर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, स्वामीत्व योजना यासाठी अनेकदा तंत्रज्ञान सुविधेचा वापर देशात झाला असून तंत्रज्ञानामुळे लोकोपयोगी योजना झपाट्याने पोहचू शकतात असेही पंतप्रधान म्हणाले.
आजपासून सुरू झालेली ही परिषद तीन दिवस चालणार असून त्यात 4 हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. 25 देशातले नामवंत तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, संशोधक या परिषदेला उपस्थिती आहेत.