नोएडा :- सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार चालू जून महिन्यात नोएडामधील 86 टक्के आणि उत्तर प्रदेशातील 94 टक्के कुटुंबांमध्ये दररोज वीज खंडित होत आहे. हे निष्कर्ष राज्यातील 75 पैकी 56 जिल्ह्यांतील 14,000 हून जणांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे.
उत्तर प्रदेशातील सर्वेक्षण केलेल्यांपैकी 65 टक्के लोकांना दररोज सरासरी तीन किंवा त्याहून अधिक वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील (नोएडा), सर्वेक्षणात 86 टक्के कुटुंबांनी या महिन्यात दररोज वीज खंडित होत असल्याची तक्रार केली. त्यापैकी 35 टक्के कुटुंबांनी असे म्हटले की, वीजपुरवठा दोन तासांपेक्षा जास्त काळापर्यंत असतो.
43 टक्क्यांनी सांगितले की, त्यांना दिवसातून एकदा किंवा दोनदा वीज खंडीत होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर 32 टक्क्यांनी तीन-पाच वेळा आणि चार टक्के लोकांनी दररोज 10 ते 20 वेळा आमच्या घरी वीज जाते, असे म्हटले आहे.