Akhilesh Yadav – मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जनतेला बदल हवा आहे. कधी भाजप तर कधी कॉंग्रेस आणि मुलभूत प्रश्न अजून सुटलेले नाहीत. आजही महागाई आहे आणि बेरोजगारी शिगेला आहे.
देशाच्या आकडेवारीचा विचार केला तर 100 पैकी 84 लोक बेरोजगार आहेत. जर मध्य प्रदेशातील आकडेवारी सत्यात उतरली तर मध्य प्रदेशातील 90% तरुण बेरोजगार आहेत, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केले आहे.
आपल्या मध्य प्रदेशच्या भेटीत ते आज निवारीतील ओरछा येथे पोहोचले. येथे त्यांनी रामराजा सरकारचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यादव पुढे म्हणाले की, येथील दुर्बल लोक ज्यांच्याकडे शेती नाही ते स्थलांतरित होत आहेत.
20 वर्षांपासून एकाच पक्षाचे सरकार आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढवण्यासाठी डबल इंजिन सरकार स्थापन करण्यात आले होते का? लोक दारिद्रयरेषेतून बाहेर आल्याचे सरकार सांगत आहे. जनता दारिद्रयरेषेतून बाहेर आली आहे, तर पाच वर्षे रेशन का द्यावे लागते? यावरून देशाची कमकुवत अर्थव्यवस्था दिसून येते.