नवी दिल्ली – आयकर विभागाने आत्तापर्यंत 23 लाख 5 हजार करदात्यांना 88 हजार 652 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. त्यातील 28 हजार 180 कोटी रुपये व्यक्तिगत आयकर करदात्यांचे आहेत. तर कंपनी करांचा परतावा 60 हजार 472 कोटी रूपयांचा आहे. आयकर विभागाने आपल्या ट्विटर अकौंटवर ही माहिती दिली आहे.
आयकर विभागातर्फे दरवर्षीच हा कर परतावा आयकरदात्यांना दिला जातो. तथापि यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना या बाबतीत कोणतीही अडचण किंवा विलंबाचा सामना करावा लागू नये अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या परतव्याद्वारे आयकर विभागाने आपली पेंडींग रिफंडची प्रक्रिया जवळपास पुर्ण केली आहे असेही सांगण्यात येते.