मुंबई – भारतात डिजिटल व्यवहाराची संख्या वेगाने वाढत आहे. डिजिटल व्यवहारासाठी भारतामध्ये पायाभूत सुविधा विलक्षण वेगाने वाढत आहेत. आता 15 ऑगस्टपासून देशभरामध्ये 75 डिजिटल बॅंक शाखा सुरू होणार असल्यामुळे भारतामध्ये डिजिटल क्रांती होणार आहे.
या बॅंक शाखा विकसित करण्याचे काम चालू असून या शाखांमध्ये कागद नावाचा प्रकार असणार नाही. वित्तीय साक्षरतेसाठी या बॅंकामधून प्रमाणात उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
75 जिल्ह्यातील या 75 शाखासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम बॅंकाकडून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालू आहे. ज्या 75 जिल्ह्यामध्ये या शाखा सुरू होणार आहेत त्यामध्ये लेह, श्रीनगर, नैनिताल आणि लखनऊ या जिल्ह्यांचा समावेश आहे. डिजिटल बॅंक शाखासंदर्भात अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्यानंतर रिझर्व बॅंकेने आठ एप्रिल रोजी अशा बॅंकासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.