मुंबई – शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे (farmers commit suicide). यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil )यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे.
देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारने ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हे सरकारचे खरे अपयश आहे, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात 1 हजार 584 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 25 वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे असे पाटील सांगितले. देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारने ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जयंत पाटील यांनी सरकारला केले.
गेल्या 25 वर्षांतील सर्वाधिक संख्या –
पाटील पुढे म्हणाले की, कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हे सरकारचे खरे अपयश आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात 1 हजार 584 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 25 वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे असे पाटील सांगितले.