नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये अडकलेल्या 58 नागरिकांना घेऊन वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर विमान तेहरानमधून भारतात दाखल झालं आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे विमान गाझियाबादमध्ये दाखल झाले आहे. इराणमधून देशात परतलेली ही पहिली तुकडी आहे. त्यानंतर इतर भारतीयांना देखील विशेष मोहीम राबवून भारतात परत आणण्यात येणार आहे.
IAF C-17 Globemaster carrying the first batch of 58 Indian pilgrims, lands at Hindon air force station in Ghaziabad from Tehran, Iran. #CoronaVirus pic.twitter.com/MA0iaJIr2l
— ANI (@ANI) March 10, 2020
कोरोना विषाणूमुळे चीननंतर सर्वाधिक बळी हे इराणमध्ये गेले आहेत. आतापर्यंत इराणमध्ये कोरोनामुळे 237 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर या देशात कोरोनाची 7 लागण झालेल्यांची संख्या हजारांहून अधिक आहे. हवाई वाहतुकीवर निर्बंध असल्याने इराणमध्ये शेकडो भारतीय अडकून होते. सध्या भारताकडे इराणमध्ये अडकून पडलेल्या 500 जणांची यादी आहे. यात काही काश्मिरी विद्यार्थी आहेत तर अनेक नागरिक आहेत.
First batch of 58 Indian pilgrims being brought back from #Iran. IAF C-17 taken off from Tehran and expected to land soon in Hindon. pic.twitter.com/IqZ8NUK1M6
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 10, 2020
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडे इराणमध्ये अडकून पडलेल्या 34 कोल्हापूरकरांना मदत करण्याची विनंती केली होती. कोरोना व्हायरसच्या भीतीने विमान वाहतूक बंद केल्यामुळे कोल्हापूर आणि परिसरातील 34 जण इराण येथे अडकले आहेत. त्यामुळे एस जयशंकर यांनी सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत’ अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली होती. जयशंकर यांनी इराणमध्ये अडकून पडलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली होती, इथे अकडून पडलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षित परत आणले जाईल असं जयशंकर यांनी कुटुंबीयांना आश्वस्त केले आहे.