नवी दिल्ली – विमान वाहतूक व एकमेकांच्या प्रदेशावरून विमानांची ये-जा पुन्हा सुरू करण्याबाबत आज भारत व पाकिस्तान यांच्या प्रतिनिधींमध्ये वाटाघाटींना आशादायक सुरुवात झाली. परस्परांतील संबंध पुन्हा सुरळीत करण्याचा निर्धार दोन्ही बाजूंनी व्यक्त केला. गेल्या वर्षी इस्लामाबाद येथे विमान वाहतुकीविषयी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या, त्याचेच सूत्र या वाटाघाटीत पुढे चालविण्यात येईल.
निऑन साइन्स, रोषणाईवर बंदी
मुंबई – अत्यंत तीव्र वीजटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने निऑन साइन्स आणि सजावटीची रोषणाई यावर बंदी घातली. सध्या 25 ते 56 टक्के वीजकपात चालू आहे.
औरंगजेबाच्या दरबारातील महाराजांचे स्वाभिमानी वर्तन
सुपे – शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात ज्या स्वाभिमानी वृत्तीचे प्रदर्शन केले ते निव्वळ औरंगजेबाने पाच हजारी मनसबदारात उभे केल्यामुळे केले असे नाही तर महाराजांना मोगलांच्या राजधानीत नव्याने महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सत्तेचा आवाज बुलंद करावयाचा होता. भारतभर स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून महाराजांनी पूर्व नियोजिरित्या खिलत नाकारली. शिवाजी महाराजांनी जीवावरचे धोके पत्करून आग्य्राच्या भेटीचा प्रपंच केला होता, असे उद्गार रतनलाल भंडारी यांनी काढले.