नवी दिल्ली –देशातील प्रौढ नागरिकांना आतापर्यंत करोनालसींचे 115 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 80 टक्क्यांहून अधिक प्रौढांनी पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. तर, दोन्ही डोस मिळाल्याने 41 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील करोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारीला झाला. त्यानंतर त्या मोहिमेने वेग पकडला आहे.
सध्या 18 वर्षांवरील प्रौढांचे लसीकरण सुरू आहे. चालू वर्षाच्या अखेपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. पुढील टप्प्यात बालकांसाठी लस उपलब्ध केली जाऊ शकते. त्याबाबतच्या निर्णयाची सध्या प्रतीक्षा आहे. करोना संसर्गापासून बचावासाठी लस हा सर्वांत प्रभावी उपाय मानला जात आहे.