बारामती – बारामती तालुक्यात जोरदार पावसामुळे नाझरे धरणातून 35000 क्युसेस विसर्ग सुरू आहे. कऱ्हा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना व जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे.
तालुक्यातील अंजनगाव करावागज रस्त्यावर पाणी येत आहे, चव्हाण वस्तीवरील 3 कुटुंब स्थलांतरित केली आहे. तर जळगाव क प मधील नदीकाठावरील 20 कुटुंब स्थलांतरित करणेचे काम सुरू आहे.पुणे आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथक मागविले आहे. मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, जळगाव सुपे, जळगाव क प , करावागज, सोनगाव, डोरलेवाडी, या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाच्या पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नाझरे जलाशयात पाणी पातळी वाढली आहे. नाझरे धरणाच स्वयंचलित दरवाजातून प्रशासनाने विसर्ग सुरू केला आहे.