नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधान मोदींनी सन २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असा दावा केला होता. आता सन २०२४ उजाडले आहे. या अवधीत शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे मोदी सरकार हे खोटारडेपणाचा कळस करीत आहे असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
एक्स वर एका पोस्टमध्ये खर्गे यांनी म्हटले आहे की, मोदीजी, आज २०२३ चा शेवटचा दिवस आहे. तुम्ही म्हणाला होता की २०२२ पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होईल. प्रत्येक भारतीयाला घर आणि देशात २४ तास वीज असेल, अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स इतकी होईल.पण यातले काहीही घडले नाही. भाजप हा खोटेपणाचा कळस करणारा पक्ष आहे असेही त्यांनी नमूद केले.
अर्थव्यवस्थेतील अपयश आणि शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांवर काँग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे.आज कॉंग्रेस अध्यक्षांनी वर्षातल्या शेवटच्या दिवसाची संधी साधून मोदी सरकारवर हा निशाणा साधला. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी देशात दर दहा वर्षानी होणारी जनगणना न केल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल केला.
.@narendramodi जी,
2023 का आज आख़िरी दिन है।
आपने कहा था कि 2022 तक ही…
🌾 हर किसान की आमदनी दोगुनी होगी।
🏠 हर हिन्दुस्तानी के पास घर होगा और उसमें 24×7 बिजली मिलेगी।
🔼अर्थव्यवस्था $5 Trillion की हो जाएगी।
ये सब तो नहीं हुआ…
…पर हर भारतीय को पता है कि
भाजपा के…
— Mallikarjun Kharge (@kharge) December 31, 2023
वास्तविक नियमानुसार सन २०२१ साली देशातील जनगणना होणे अपेक्षित होते. पण कोविडचे कारण देत त्यांनी ही जनगणना टाळली. पण अजूनही त्याच्या काही हालचाली नाहीत, त्यामुळे हा केवळ कोविडचा प्रश्न नाही तर वेगळेच काही तरी शिजते आहे असा दावाही जयराम रमेश यांनी केला आहे.