आळंदी ग्रामीण रुग्णालयात घेतली शपथ
स्वेच्छेने ऑनलाइन फॉर्म भरले
आळंदी – केंद्र आणि राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीमे अंतर्गत आळंदी ग्रामीण रुग्णालयात अवयव दान शपथ घेण्यात आली. तसेच अवयव दान करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या एकूण 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने ऑनलाइन फॉर्म भरले.
आळंदी येथे आयोजित आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पांडुरंग गावडे, उद्योजक तथा आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल चव्हाण, संकेत वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी तथा सहसंचालक (तांत्रिक) बोरावके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ, एन. एच. एम. समन्वयक गणेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्यात तज्ज्ञ डॉक्टर स्री, बाल, अस्थी, शल्य चिकीत्सक, नाक-कान-घसा, नेत्र, दंत चिकित्सक आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. मेळाव्यामध्ये एकूण 948 रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले तसेच निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे या संकल्पने अंतर्गत 252 (18+) पुरुषांची तपासणी आणि उपचार करण्यात आले, पैकी सहा रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली.