सणबूर – पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांसाठी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पाणी पुरवठा जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत. या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पुन्हा नव्याने करण्यात येऊन जलजिवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाचे नियमानुसार घरोघरी नळ जोडणी या योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आवश्यक निधी मंजूर होण्याकरीता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील 28 नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना 14 कोटी 89 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
पाटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना आवश्यक निधी मंजूर करण्यासंदर्भात संबंधित गावातील ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. त्यानुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे केलेल्या शिफारसीनुसार पाटणला 28 नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना 14 कोटी 89 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
असल्याचे नमूद करत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये जानुगडेवाडी 27.92 लाख,आंबेघर तर्फ मरळी 27.17 लाख, चाफळ 163.26 लाख, शिंदेवाडी 22.44 लाख, चौगुलेवाडी मुठ्ठलवाडी 90.64 लाख, ढाणकल 29.24 लाख, गाडखोप 21.56 लाख, नाव 18.47 लाख, मालोशी 39.92 लाख, बांधवाट 19.83 लाख, डांगीष्टेवाडी 19.26 लाख, बोपोली 29.80 लाख, शिवंदेश्वर 22.84 लाख, बनपूरी 197.52 लाख, मुरुड 42.41 लाख, काहिर 50.31 लाख, आटोली 106.21 लाख, पाडळोशी, तावरेवाडी व मसुगडेवाडी 43.05 लाख, गलमेवाडी 83.37 लाख, गव्हाणवाडी 67.39 लाख, सांगवड 40.43 लाख,
सातर 42.82 लाख, लोटलेवाडी (काळगाव) 22.01 लाख, रुवले 55.78 लाख, गोषटवाडी 40.82 लाख, घाटमाथा ढाणकल 17.29 लाख, बोडकेवाडी 35.23 लाख, ऊरुल 51.40 लाख, आंब्रुळे 35.76 लाख, निवडे पुनर्वसन 24.88 लक्ष या कामांचा समावेश होत आहे. जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामांची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीमध्ये दिल्या असून लवकरच मंजूर असलेली नळ पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासणाऱ्या या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
======================