पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला एकाच दिवसात 41 कॉपी बहाद्दर विद्यार्थी सापडले आहेत.
राज्यात नऊ विभागीय मंडळात बारावीची परीक्षा सुरु झालेली आहे. यात दररोज काहीना काही गैरमार्ग प्रकरणे आढळून येवू लागलेली आहे. रसायनशास्त्र, एमसीव्हीसी पेपर क्रमांक 1 मध्ये 27 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले आहे.
यात औरंगाबादमध्ये 15, मुंबईत 1, अमरावती 8, नाशिक 1, लातूर 2 अशी प्रकरणे आढळून आली आहेत. राज्यशास्त्र विषयात 14 कॉपीची प्रकरणे सापडली आहेत. यात अमरावती विभागात सर्वाधिक 12, औरंगाबाद 1, लातूर 1 याप्रमाणे प्रकरणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आलेली आहे.