नवी दिल्ली – भारतात फोन कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या वाढली असून भारतातील नागरिकांकडे एकूण 118 कोटी 96 लाख इतकी फोन कनेक्शन असल्याची माहीती दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिली आहे. शहरातील फोन घेणाऱ्यांची संख्या कमी वेगाने वाढत आहे. मात्र ग्रामीण भागात फोन घेणाऱ्यांची संख्या अधिक वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. शहरातील 65 कोटी नागरिकाकडे फोन कनेक्शन आहे तर ग्रामीण भागातील 53 कोटी लोकांकडे फोन कनेक्शन आहे.
रिलायन्स जिओ या कंपनीकडे सध्या 42 कोटी 65 लाख इतके ग्राहक आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील एअरटेल कंपनीकडे 35 कोटी 39 लाख इतके ग्राहक आहेत. व्होडाफोन -आयडिया कंपनीकडे 26 कोटी 90 लाख ग्राहक असल्याचे दूरसंचार नियामक प्राधीकरणाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.