वाघोली – श्रीराम मंदिर बांधल्याने करोना जाणार नाही. याबाबत खासदार शरद पवार यांनी काढलेल्या उद्गाराबाबत त्यांचा निषेध म्हणून त्यांना प्रभू श्रीरामाच्या नावाची आठवण करून देण्यासाठी जय श्री राम लिहिलेली पत्र पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवास स्थानी पाठवण्यात येत आहेत. त्याची सुरुवात वाघोली येथून करण्यात आली. वाघोली येथील पोस्ट ऑफिसमधून 1 हजार 111 पत्र भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठवली. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे प्रभारी अध्यक्ष संदीप सातव, जिल्हा संयोजक दादासाहेब सातव, उपाध्यक्ष गणेश कुटे, रासपचे सागर गोरे, शरद आव्हाळे, गणेश सातव, दिनेश झांबरे, ज्ञानेश्वर गुंड यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.