– शरद पवारांचे भाजपाला खुले आव्हान
मुंबई : विसंवादामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळेल आणि महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका होतील, अशी शक्यता वर्तवणाछया भाजपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मध्यावधी निवडणूका नुसत्या राज्यातच कशाला? “मध्यावधी निवडणुका फक्त देशात होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या,’ असे सांगत शरद पवार यांनी थेट संपूर्ण देशाची लोकसभा निवडणूका घेण्याचे खुले आव्हान भाजपाला दिले आहे.
एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पाश्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. “महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. मध्यावधी निवडणुका घ्या’, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, मध्यावधी राज्याच्या होत नाही संपूर्ण देशाच्या होतात. लोकसभेच्या मध्यवधी निवडणुका घ्यायच्या असल्या तर ते भाजपाच्या हातात आहे. भाजपाने केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेऊन पुन्हा निवडणूक घ्यावी,’ असा खोचक सल्लाही पवारांनी दिला.
“महाविकास आघाडी सरकार पडेल, असा दावा अनेकदा भाजपाकडून केला जातो यासंदर्भात तुमचे मत काय?’, असा सवालही पवारांना विचारण्यात आला. “अशा गोष्टी मी गांभीर्याने घेत नाहीत. विरोधक एकदा हे बोलतात दुसछया दिवशी ते बोलतात. राज्याच्या भल्यासाठी जे शक्य आहे ते करत राहणे हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाछयांचा विचार आहे,’ असे पवार म्हणाले.