सिंधुदुर्ग : कोकणातला चिपी विमानतळ येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपी विमानतळाची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यां समवेत आढावा बैठक घेतली.
नंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. विमानतळाला आवश्यक असलेल्या पाणी, वीज, दूरध्वनी अशा सर्व प्रकारच्या जोडण्यांची कामं झाली असून येत्या एक मे रोजी विमानतळ सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी आय आर बी चे अधिकारी, खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री ऍड. अनिल परब उपस्थित होते.