मंचर- येथील हॉटेल आस्वाद येथे महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांतर्गत 5 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तहसीलदार रमा जोशी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) करण्यात आले, अशी माहिती हॉटेल मालक अजय काटे यांनी दिली.
यावेळी सरपंच दत्ता गांजाळे, तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बेंडे, अरुण बाणखेले, रंगनाथ थोरात, भाजपचे युवा कार्यकर्ते संदीप बाणखेले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळीत देण्यात येणार असल्याचे सांगून हॉटेल मालक अजय काटे म्हणाले की, या थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक मुदभात देणार आहे. दररोज दुपारी बारा ते तीन या वेळेत शिवभोजन थाळी ग्राहकांना दिली जाणार आहे.