दिल्ली : भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ४ एप्रिल रोजी कोरोना बाधितांची संख्या २९०२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २६५० कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.
तर, १८३ जणांना रुग्णलयातून घरी सोडण्यात आले आहे. मागील १२ तासात भारतात कोरोनाचे ५५५ नवे रुग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात ९ टक्के कोरोनाबाधित रुग्ण ० ते २० वयदरम्यान आहेत. तर ४२ टक्के लोक २० ते ४० वयाचे आहेत. ३३ टक्के रुग्ण ४० ते ६० वयाचे असून १७ टक्के कोरोनाबाधित रुग्ण ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत.