प्रवाशांची होतेय हेळसांड : मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज होतेय व्यक्त
नगर – अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शहरात सहा जुलैपासून बस सेवा सुरु करण्यात आली. सध्या शहरात 14 बसची सेवा सुरू करण्यात आली. या बसेस नगर-एमआयडीसी, नगर-निबळक, नगर-निर्मलनगर तसेच भिंगार या रस्त्यांवर धावतात आहेत. मात्र, शहरात अनेक बस स्थांब्यांची दुरावस्था झाली आहेत तर काही थांबे गायब झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची बसथांब्यावर गैरसोय होते.
शहरात सावेडी, पत्रकार चौक, जिल्हा रुग्णालय, अण्णाभाऊ साठे चौक, रेसिडेन्शिअल स्कूल, दिल्ली गेट, वाडिया पार्क, नगर कॉलेज आदी ठिकाणच्या बस थांब्यांवर प्रवाशांची बसण्याची सोय नाही, त्यामुळे अनेक ठिकाणच्या बस थांब्यांवर प्रवासी उभा असल्याचे चित्र पहावयास मिळते. अनेक बस थांब्यांवर अनेकांनी अतिक्रमण करून छोटे – छोटे व्यवसाय सुरू केले.
न्यू आर्ट कॉलेज समोरील बस थांब्या शेजारी एक चहाची टपरी सुरू करण्यात आली. तेथील बस थांब्यावर बसण्याची सोय नाही. प्रवासी रस्त्याच्या कडेला उभं राहून बस ची वाट पाहतात. आणि टपरीवरील ग्राहक बस थांब्यात खुर्च्या टाकून बसलेली असतात. मनपाच्या बस थांब्यावर अतिक्रमण चालू आहे आणि मनपा याकडे डोळेझाक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महापालिकेची बस सेवा खासगीकरणातून चालवण्यात येते. आतापर्यंत अनेक कंत्राटदार कंपन्या बदलल्या आहेत. विविध कारणांमुळे बंद पडणारी बससेवा आता पुन्हा सुरू झाली आहे. मात्र केवळ बससेवा असून चालणार नाही.
तर प्रवाशांसाठी थांबायचे बसथांबे देखील चांगले सुस्थितीत असणे अपेक्षित आहे. मात्र महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. सुरुवातीला बससेवा सुरू झाली त्यावेळेस बसथांबे तयार करण्यात आले होते. मधल्या काळात बस सेवा बंद पडली. त्यामुळे बस थांब्याची दुरावस्था झाली. आता पुन्हा बससेवा सुरू केली, मात्र, बसथांबे सुस्थितीत नाहीत. शहरातील बहुतांश बसथांब्याची दुरावस्था झालेली आहे.
पूर्वी बसथांब्यात प्रवाशांना बसण्यासाठी सोय केलेली असायची आता तर बसथांब्यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या नसल्याचे दिसून येते, त्यामुळे प्रवाशांना बसता येत नाही काही. प्रवाशांची गैरसोय होते. अनेक ठिकाणच्या बसथांबा मध्ये नागरिकांनी अतिक्रमण करून स्वतःची छोटे-मोठे उद्योगधंदे चालू केले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी बस थांब्याचा गुरे बांधण्यासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे शहरातून बसथांबे गायब झाल्याचे चित्र आहे.
शहरात प्रवाश्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरू करण्यात आली. मात्र; बस थांब्यावर प्रवाशांची बसण्याची सोय नाही. त्यामुळे प्रवाशांची आबाळ होते. शिवाय ज्येष्ठ प्रवासी उभं राहून बसची वाट पाहू शकत नाहीत. त्यामुळे आमच्या सारख्या तरूण प्रवाशांच्या तुलनेत यात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते.
राहुल शिंदे , प्रवाशी