बंगलुरू – बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे भाजप नेते येडियुरप्पा यांनीही स्वागत केले आहे. या बंडखोर आमदारांचाच हा नैतिक विजय आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कोणताहीं राजकीय पक्ष या आमदारांवर व्हीप लागू करू शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
गुरूवारी कुमारस्वामी सरकार आपला विश्वास दर्शक ठराव मांडणार आहे. त्यामुळे उद्याच या सरकारचे पतन निश्चीत आहे असे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या पाठिशी बहुमत नसल्याने कुमारस्वामींना उद्या आपोआपच राजीनामा द्यावा लागेल असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आता विधानसभेच्या सभपतींना आमदारांच्या राजीनाम्याच्या विषयावर शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा लागले आणि तो निर्णय त्यांना सर्वोच्च न्यायालयाला कळवावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे केवळ एक अंतरीम आदेश असून ते पुढील काळात सभापतींची कामकाजातील भूमिका निश्चीत करतील हा संसदीय लोकशाहींतील एक नवा पायंडा आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.