अटारी – काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने ३६० भारतीय कैद्यांची सुटका करण्याची घोषणा केली होती. त्या नुसार पाकिस्तानने आज १०० कैद्यांची सुटका केली असून, त्यांनी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला.
Punjab: Third batch of 100 fishermen released by Pakistan cross over to India via the Attari-Wagah border. pic.twitter.com/GHit6TtPIy
— ANI (@ANI) April 22, 2019
चालू महिन्यात चार टप्प्यांत भारतीय कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती, पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली होती. सध्या पाकिस्तानी तुरूंगांमध्ये ५३७ भारतीय कैदी आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सागरी सीमेची स्पष्ट आखणी झालेली नाही. त्यातून एकमेकांची सागरी हद्द ओलांडल्याच्या आरोपावरून दोन्ही देशांकडून परस्परांचे नागरिक असणाऱ्या मच्छिमारांना अटक केल्या जाण्याच्या घटना वारंवार घडतात.