मुंबई: काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेय.
भारत सरकारने याचा खुलासा केला असला तरी देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींनी या वक्तव्याबाबत खुलासा करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडले.
काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तान या दोन देशआंमध्येच चर्चा होणे अपेक्षित असून यात कोण्या तिसऱ्याने पडण्याची गरज नाही. ही गोष्ट स्पष्ट करण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांची असल्याचे नवाब मलिक म्हणाले.